शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे, खते, पीककर्ज द्या

    12-Jun-2024
Total Views |
 
 

farm 
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांअभावी कुठेही पेरण्यांना विलंब हाेता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करावा. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीककर्ज मिळण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयु्नतांना दिले.पवार यांनी मंत्रालयीन दालनात राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीककर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियाेजन, पूरनियंत्रण, चारा उपलब्धतेबाबत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला.बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव चांदवले आदी उपस्थित हाेते.
 
पुणे विभागीय आयु्नत चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयु्नत निधी पांडे, नागपूरच्या विभागीय आयु्नत विजयालक्ष्मी बिदरी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपायु्नत जगदीश मणियार, नाशिक विभागाच्या उपायु्नत राणी ताटे, काेकण विभागाचे उपायु्नत संजीव पलांडे, कृषी आयु्नत रावसाहेब भागडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. पुणे विभागीय आयु्नत पुलकुंडवार यांनी आषाढी वारीच्या नियाेजनाबबात माहिती दिली. आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडताेब वितरित करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले.राज्यात काही भागांत 100 मि.मी.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
 
अशा स्थितीत वापसा आल्यानंतरच पेरण्यांचे नियाेजन करावे; तसेच पुरेसा पाऊस पडला नसलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. यासाठी कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती करावी, असेही पवार यांनी सांगितले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी साेडण्याचे काटेकाेर नियाेजन करावे. आंतरराज्यीय धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियु्नत करावा.त्याच्या माध्यमातून याेग्यवेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियाेजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण हाेऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी.आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे काेल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियाेजन करावे; तसेच मेडिगट्टा, गाेसीखुर्द धरणांबाबतही सतर्क राहून गडचिराेली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण हाेणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे निर्देशही पवार यांनी दिले.