राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’ ग्रंथावर डाेंबिवलीत चर्चा; मान्यवरांचा सहभाग

    23-Sep-2023
Total Views |
 
 
Dombivali
 
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड आणि डी. वाय. पाटील विद्यापीठनिर्मित लेखक राजन लाखे यांच्या शांता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ ‘बकुळगंध’ यावर डाेंबिवली येथे समीक्षात्मक चर्चा झाली.त्यावेळी व्यासपीठावर संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक वामनराव देशपांडे, ‘कुटुंब रंगलय काव्यात’फेम विसुभाऊ बापट, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरीचिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, मसापडाेंबिवलीचे सुरेश देशपांडे, लेखक रमेश धनावडे, वैभव धनावडे आदी उपस्थित हाेते.कार्यक्रमात शांता शेळके यांच्यावर आधारित असलेल्या या ग्रंथचर्चेत वामनराव देशपांडे, विसुभाऊ बापट, सुरेश देशपांडे यांनी सहभाग घेतला.
 
साहित्यविश्वात एका कवयित्रीवर, तिच्या साहित्यावर तसेच आठवणींवर अशा प्रकारचा ग्रंथ आजपर्यंत झाला नसल्याचे मत व्य्नत करून संदर्भग्रंथ म्हणून ‘बकुळगंध’ हा ग्रंथ माेलाची भूमिका बजावेल, असे भाकित केले.रमेश धनावडे यांनी राजन लाखे यांची मुलाखत घेतली. विचारलेल्या विविध प्रश्नांच्या माध्यमातून ग्रंथप्रक्रियेची निर्मिती, शांता शेळके यांचे साहित्य, त्यांच्या आठवणी रसिकांपर्यंत पाेहचविल्या. गायक संताेष संकपाळ व गायिका रीचा राजन यांनी शांता शेळके यांची प्रसिद्ध गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मुंबई आकाशवाणीच्या निवेदिका पूजा काळे यांनी सूत्रसंचालन केले. वैभव धनावडे यांनी आभार मानले.