प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा

09 Aug 2023 15:36:25
 
 

Gondavlekar 
 
काेर्टातली शपथ ज्याप्रमाणे लाेक खरी मानत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचांत काही लाेक लबाडीने वागतात, आणि त्याला ‘हा व्यवहार आहे’ असे म्हणतात; हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही तर ताे नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार! कर्ज ार झाले म्हणून प्रपंच साेडला, यांत काेणता स्वार्थत्याग आहे? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले, तर जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गाेळा करून शेकाेटी केली, जागा साफ केली, तुळशी लावल्या, झाेपडी बांधली; पण भिक्षेला जाताना झाेपडीची काळजी केली, तर मग घरादारानेच काय केले हाेते? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते; जबरदस्तीने साेडून कुठे साेडता येते? पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बराेबर नाही.
 
या गडबडीतच, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशाची ठेवायची? तर मी जन्माला आलाे तेव्हा जे कबूल केले, ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा.विषयात गुंग झालाे, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्या वेळी भगवंताचे स्मरण ठेवावे. आपण विषयाला जसे शरण गेलाे तसे भगवंताला शरण जावे. चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलाे हे पाहावे. विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे हे पाहता येते.व्यसनी माणसाने, व्यसनापूर्वी मी कसा वागत हाेताे याचा विचार करावा. मारुतिरायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात हाेताे, आता विषयांत त्याची आठवणही येत नाही, याला काय करावे? नाेकरीत नाही की तुम्ही वरिष्ठाला शरण जात? मग जे पाेटाकरता करता ते भगवंताकरता का नाही करीत?
 
भगवंताला शरण जाणे सर्वांत सापे आहे; त्याला निराळ्या काेणत्याही वस्तूची जरूरी नाही लागत.माझ्या मनांत येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल.भगवंताला शरण जाणे म्हणजे ‘मी त्याचा झालाे’ असे म्हणणेच हाेय. ‘मी रामाचा झालाे; जे जे हाेते ते रामइच्छेने हाेते’ असे जाे म्हणताे त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही.समर्थांना सामर्थ्य येण्याचे कारण, काेणी कसाही असाे, त्यांनी मार्गाला लावले. पापी, दुष्ट असला तरी त्यांनी त्याला धिक्कारले नाही. वाईट लाेकांना सुधारणे हेच संताचे खरे कार्य आहे, तेच समर्थांनी केले. जसा जाे भेटला त्याप्रमाणे त्याला उपदेश केला.प्रपंच धरून परमार्थ कसा करावा याची युक्ती त्यांनी सांगितली. साधुसंतांकडे आपण जे जाताे ते स्वत:च्या स्वार्थाकरिता जाताे. समर्थांनी सर्व जगाचा स्वार्थ पाहिला.प्रपंच सावधानपणे पण दक्षतेने करावा असे त्यांचे म्हणणे असे.
Powered By Sangraha 9.0