देहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बराेबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दाेष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे म्हणजे कुळाची कीर्ती वाढते. माेठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नाेकर हाेऊन राहावे. बाईनेही पतीपुरते दैवत न मानावे.सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे.जाे मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दु:खदायक हाेणार नाही.आपण अस्वाभाविक रीतीने, म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे, म्हातारपणी कर्तेपण कमी हाेते आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते.
ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असताे, त्याचा देह जरी अशक्त झाला तरी ताे सर्वांना हवासा वाटेल.अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गाेष्टींची आठवण राहणार नाही; त्याची झाेप कमी हाेईल; पण हे सर्व हाेऊनही त्याचा काेणी कंटाळा करणार नाही, आणि त्याला स्वत:लाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे! ‘पण मी सांगताे ना !’ ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दु:ख नाहीच नाही. वयाची साेळा ते पंचवीस वर्षें हा काल असा असताे की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ याेग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते.
बंधनांत उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे हाेय. कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसताे.जगामध्ये प्रत्येक गाेष्ट आपण स्वत:च्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा ायदा आपण जरूर करून घ्यावा. आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे. परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. काेणता काळ कुणाच्या भाग्याने येताे हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी हाेऊ नये. सत्कर्म जेवढे माेठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वांत माेठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि नि:शंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या.