नामस्मरणातूनच देहबुद्धीचा नाश

01 Jul 2023 15:10:25
 
 

Gondavlekar 
 
सत्पुरुषाची लक्षणे जाे पुष्कळांना मनापासून आवडताे ताे मनुष्य चांगला; असा मनुष्य अजरामर हाेताे. ताे नि:स्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवताे. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून हाेणेच शक्य नाही.असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई, मुलाला मुलासारखा दिसताे; म्हणजेच, जाे ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते. असा मनुष्य काेणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बाेलत नाही. मान घ्यायला याेग्य असूनही मानाची अपेक्षा ताे करीत नाही. स्वत:च्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असताे, आणि दुसऱ्यांच्या दु:खात ताे त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असताे.
ताे सहजावस्थेत राहताे; म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा याेगी मनुष्य खराेखरच मुक्त समजावा. समर्थ असे हाेते, आणि स्वत: आचरण करून मगच लाेकांना त्यांनी सांगितले.
 
भगवत्कृपेने मी सर्व कृत्ये करताे असे म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल? दक्ष असल्याशिवाय संत हाेणेच कठीण आहे.ज्याला देहाचे प्रेम नाही ताे खरा बुवा. बुवाला आपण बावळट नाही समजू. अंतरंग ओळखायला स्वत:पासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. दु:ख भाेगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावे. ज्याला सुखदु:ख बाधत नाही ताेच खरा समाधानी. मी राेज नामस्मरण करताे, चार वर्षें माझे भजन नाही चुकले, असे आपण म्हणताे; पण ‘मी हे सर्व करताे’ अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयाेग? मी मेहनत घेताे पण थाेडक्याने नासते, ते या अभिमानामुळे जाेपर्यंत अभिमान साेडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही ताेपर्यंत ते स्मरण कसे म्हणावे?
 
भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून, मी अनन्यपणे वागताे असे कसे म्हणता येईल? मी तुम्हाला खरेच सांगताे, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा, तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.खुणेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे, म्हणजे मार्ग सापडताे. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसताे; आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण हाेते.भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही येाग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास! नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलाे तर नामाचाच विसर पडताे, हे कुठे ध्यानात येते ! उगीच विचार करीत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा.
Powered By Sangraha 9.0