चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी; अन्यथा नुकसान हाेते

28 Jun 2023 11:51:39
 
 
 
Gondavlekar
भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान साेडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरुकृपा झाल्याशिवाय राहात नाही. ‘अमुक एक साधन करीत जा’ म्हणून सद्गुरूने सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलाे, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे? चारपाच वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलाे तर साधनांचा जाेर कमी हाेताे आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही हाेणार ते सद्गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने हाेते, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनेचे प्रेम ताे भगवंतच देताे हे आपण विसरून जाताे.
 
आठाचे आठ लक्ष झाले ते भगवंताने केले असे एखादा साधा मनुष्य म्हणू लागताे; पण आपण साधक, पूर्वी काही साधना करीत नव्हताे, ते आता करू लागलाे, असा साधनांबद्दलच अभिमान बाळगू लागलाे तर काय उपयाेग!सद्गुरूच्या पायावर एकदा डाेके ठेवले की काहींचे काम हाेते, यात ‘सद्गुरू पक्षपात करतात’ असे कसे म्हणता येईल? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत हाेते, परंतु घ्यायचे काही जमले नाही; ते आता घेऊ लागलाे हे त्याच्या कृपेने घेऊ लागलाे हे नाही का समजू? ‘कर्ता राम आहे’ असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले. प्रपंचात मनुष्याला धीर हवा.आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे.ार चिकित्सा करण्याने नुकसान हाेते. विद्येचे फळ काय, तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करीत बसायचे! चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी.
 
ती मर्यादेबाहेर गेली की, आपण काय बाेलताे हे आपले आपल्यालाच कळत नाही. समजा, एक मुलगा राेज तालमीत जाताे आणि चांगले दूध, तूप खाताे; पण ताे जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काही तरी राेग आहे असे नक्की समजावे. त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण ताे दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे; हे काही खऱ्या सुधारणेचे लक्षण नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. काेणत्याही कालात, कशाही परिस्थितीत, आपल्याला आनंदरूप बनता येईल.आजपर्यंतचा आपला अनुभवपाहिला तर ‘आपण केले’ असे थाेडेच असते; म्हणून परिस्थितीबद्दल ारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे.आपल्या वृत्तीवर परिणाम हाेऊ देऊ नये. अभ्यास केला तर थाेड्या दिवसात हे साधेल.
Powered By Sangraha 9.0