मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवण्याचा प्रयत्न करू लागताे; ‘जगला तर देवाला अर्पण करीन’ म्हणताे. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा साेडणार; मग ताे आज मरण पावला तरी कुठे बिघडले? मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरिताच.जन्ममरणाच्या ेऱ्यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा, मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे! एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले ताे नाही देवाजवळ असे मागणार. खरा भक्त ताेच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागावे हे बराेबर समजते. मरणाला जे कारण झाले ते चुकवावे. मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे; मग ते चांगले यावे असे नाही का वाटू? ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगले मरण.
जाे मरताे त्याचा आपण शाेक करताे, ‘देव आज लाेपला’ असे म्हणताे, ते आपल्या स्वार्थापाेटीच. खराेखर, नामस्मरणाने काय साधते हे ज्याला कळत नाही त्यानेच दु:ख करावे. स्वत:ला विसरणे, ‘मी काेण’ हे न जाणणे, हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरिता, आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जाेवर स्थिर आहे ताेवर कार्य साधून घ्यावे. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले आज चालले आहे. संकल्पविकल्पांनीआपण बेजार हाेताे. तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म हाेताे ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी. नामात राहणे म्हणजेच वासना मारणे, म्हणजेच मरणातील हाेणे.भगवंताचे हाेऊन राहणे हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जाे काळ त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली! ज्ञानी नाही मरणाची काळजी करीत. नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे. जगणे हे काहीतरी हेतूसाठी, ध्येयासाठी असावे. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावे.
भाग्याचा दिवस ताेच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला. वास्तविक, आम्ही दरराेज जगताे आणि मरताे.एकदा निजला आणि पुन: जागा नाही झाला की तेच मरण! झाेप हे एक प्रकारचे मरणच आहे. एवढ्याकरिता, झाेपी जाताना नामस्मरण करीत करीत झाेपी जावे, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. पण झाेपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याचा अगाेदर अभ्यास करणे जरूर आहे. जागृतीत अभ्यास केला नाही तर झाेपेच्या वेळी दुसरेच विचार येतील; नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारात पटकन झाेप लागून जाईल. सदाेदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसे येईल? अभ्यास अगाेदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी ताे कसा येईल? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करू या.