नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाही

02 Jun 2023 19:20:39
 
 

Gondavlekar 
 
मनुष्य चूक करताे, आणि ‘देवा, क्षमा कर’ म्हणताे, पण पुन्हा पुन्हा चुका करीतच रहाताे. हे काही याेग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. ‘देवा, क्षमा कर’ हे म्हणणे इतके सहज हाेऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. ताे जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हापुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही.बुद्धीच्या जाेरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? तेव्हा इथे शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा. समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखाेद्गत केले, प्रवचने ऐकली, तरी मनाला समाधान लाभणार नाही.
 
त्याप्रमाणे थाेडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर काेणत्याही गाेष्टीने पूर्तता येऊ शकत नाही नामाशिवाय खरे समाधान नाही मिळणार.ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान काेणत्याही गाेष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान नाही मिळणार. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान काेणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्यभावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला हाेता. माेठ्या कष्टाने ताे पायी चालला हाेता. वाटेत एक रेल्वेचे ाटक लागले, ते बंद हाेते म्हणून ताे थांबला. इतक्यात तिथे एक माेटार येऊन उभी राहिली. आत एक माेठा श्रीमंत माणूस बसला हाेता.
 
ताेही पंढरपूरला चालला हाेता. वारकऱ्याच्या मनात आले, ‘देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करताे, परंतु माझी ही दशा; आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू सर्व ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवताेस.काय तुझा हा न्याय!’ एवढ्यात माेटारीचे दार उघडून दाेन नाेकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले.ताे पांगळा हाेता ! तेव्हा वारकऱ्याला वाटले की त्याच्यापेक्षा आपण खूप बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे ताे सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालताे, पण तसा ताे नसताे. त्याचे दु:ख आपल्याला माहीत नसते; आणि ताे स्वत:ला जर सुखी समजत असेल तर ताे दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणू या. यामुळे दु:खाचा आणि सुखाचा आवेग कमी हाेईल.
Powered By Sangraha 9.0