परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधनेची महत्त्वाची चार अंगे

06 May 2023 17:25:19
 
 

Gondavlekar 
 
मी जेव्हा भजन करीत असे त्या वेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसेच तुम्हांला व्हावे अशी माझी इच्छा आहे, आणि तसे तुम्हाला हाेऊ शकेल म्हणूनच हे मी सांगताे आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकानं अंतर्मुख हाेऊन आपले दाेष काय आहेत ते हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डाेंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वत:च्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दाेषांकडे पाहताे; त्याला स्वत:च्या डाेळ्यांतले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डाेळ्यांतले कुसळ मुसळापेक्षा जास्त माेठे दिसते, हेच चुकते.आपण दुसऱ्याचे दाेष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये.
 
राेज निजण्याच्या वेळेस, आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालविला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी हाेत जाईल. राेज असे तुम्ही करीत जा म्हणजे तीन महिन्यांत तुमचे चित्त शुद्ध हाेईल. चित्त शुद्ध हाेण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग.सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलाे तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबाेध हाच सत्संग हाेईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की, जाे विश्वासाने हा ग्रंथ वाचील, त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते हाेत असे समजावे.
 
त्यांनी चार गाेष्टी करायला सांगितले आहे. एक, निर्गुंणत्व कळायला कठीण, म्हणून सगुणाेपासना करावी. त्यानेच निर्गुणरहस्य कळेल. दुसरी गाेष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावताे. सर्वांशी जाे नम्र ताेच भगवंताला प्रिय असताे.तिसरी गाेष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे. त्याचे महत्त्व ार आहे. चाैथी गाेष्ट म्हणजे भगवन्नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्माप्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये; ज्यांना ते वाटते त्यांना गुरू भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी? गुरू एकदा भेटला की, आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते, त्यानेच गुरू भेटल्याचे सार्थक केले असे हाेते. गुरुआज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते. ताेच परमार्थ, आणि तीच त्याची तीर्थयात्रा हाेते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही.
Powered By Sangraha 9.0