प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असताे. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. ताे काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगताे. पण ते सुख क्वचितच मिळते.ज्या आनंदातून दु:ख निघत नाही ताेच खरा आनंद.जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दु:ख का हाेते? वास्तविक आपण कशाकरिता काय करताे हेच विसरताे. म्हणजे, मनुष्य जगताे आनंदासाठी, पण करताे मात्र दु:ख! दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे ताेपर्यंतच असताे, त्याचप्रमाणे विषयापासून हाेणारा आनंद ताे विषय भाेगीत असेपर्यंतच टिकताे.
दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असताे. आपण जगामध्ये व्याप वाढविताे ताे आनंदासाठीच वाढविताे. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की ताे आनंदपण मावळताे.यासाठी ताे आनंद अशाश्वत हाेय. म्हणून खरा आनंद कुठे मळताे ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहितच असताे. स्वानंदस्मरणा व्यतिरिक्त जे स्ुरण ताेच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. काेणतीही वस्तू अस्तित्वात नसताना हाेणारा जाे आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे.
आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक हाेय. थाेडक्यात, आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच हाेय. जाे नि:स्वार्थ बुद्धीने प्रेम करताे त्याला आनंद खास मिळताे. घेणारा ‘मी’ जेव्हा देणारा हाेताे त्याच वेळेस त्याला खरा आनंद हाेताे. ब्रम्हानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून ताे चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे,‘‘रामा, माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी येऊ देऊ नकाे. तुझे चरण, तुझे हास्य, मला सदा पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव.’’ रामाला प्रेमाने आळवून, राम परमानंदरूप आहे असे जाणून, त्याच्याशी अनन्य असावे. असा अभ्यास करून पाहा. अखंड रामस्मरणात राहा, किती समाधान बाणेल!