भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे

22 May 2023 13:15:18
 
 

Gondavlekar 
 
भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असताे ताे आनंद वर्णन करून समजणार नाही जिथे दु:खच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला काेण असणार? अनन्य भक्त व्हावे आणि ताे आनंद पहावा.भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहाेत असे दिसते; म्हणजे सर्व चराचर वस्तू ताे भगवद्रूपच पहात असताे.एखाद्या खाेलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले, तर कुठेही पाहिले तरआपल्याला काय दिसेल? आपल्या स्वत:शिवाय दुसरे काहीच दिसणार नाही. म्हणजे, सर्व ठिकाणी एकभाव झाला तिथे दु:खाचे कारणच नाही तिथे सर्वत्र आनंदच असताे.त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरता ते आपल्या आनंदात राहूनही इतर लाेकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लाेकांना सन्मार्ग दाखविला.
 
समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लाेकांना आपल्या पदाला नेले. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही. म्हणून, ज्यांनी ताे आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच रहातात, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे; म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे. आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालताे, त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित हाेते. एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यावाचून रहाणार नाही. त्याप्रमाणे, आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली, पण त्यापासून दु:खच प्राप्त झाले.
 
पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे.खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे, सनातन सुख हाेय. ते सनातन वस्तूपाशीच, म्हणजे भगवंतापाशीच असते. ताेंड गाेड करण्यासाठी जशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त हाेण्यासाठी नाम घ्यावे लागते. आपण प्रपंच दुसऱ्याचाच करताे, आपला करीतच नाही. आपण सर्व मिळवताे पण सर्व ठेवून जावे लागते. आपल्या ायद्याचे केले तरच आपला प्रपंच; भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद हाेताे. असे कर्म करा की जे बंधनाला कारण न हाेता भगवंताकडे नेईल.
Powered By Sangraha 9.0