परमेश्वराशी संवाद साधायचा असेल, तर सर्वांत पहिल्यांदा आपली विचारसरणी बदलली पाहिजे. मनुष्य वाईट नाही. त्याच्याकडील विचार वाईट आहेत.प्रार्थना करता करताही मनुष्य हाच विचार करताे की, ‘हे देवा ! शेजारच्याचं वाटाेळं झालं की, माझं दुकान खूप चालेल.’ याला मनाेप्रदूषण म्हणतात.मनुष्याच्या आहाराबराेबरच प्रार्थनासुद्धा आता तामसी व्हायला लागलीये. हे लक्षात ठेवा की, तामसी वृत्तीने केली गेलेली प्रार्थना देवापर्यंत कधीच पाेहाेचत नाही.