आपण प्रपंचात पडलाे की आपल्याला परमार्थ पाहिजेच

26 Apr 2023 17:09:11
 
 
 

Gondavlekar 
 
ज्या दानाची आठवण राहात नाही ते दान खरे हाेय. जेव्हा आपण बक्षीस देताे, त्यावेळी काेणतीही अट न ठेवता ते दिले तरच त्याला बक्षीस म्हणता येईल. शुद्ध भावना म्हणजे माेबदला न घेण्याची किंवा फलाशा साेडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन-अर्चन केले, म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना, त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. तुम्ही सर्व लाेक भजन-पूजन करता, परंतु हे सर्व कसे हाेऊन बसले आहे, जसे शास्त्रात भांडे कुठे ठेवावे, पळीताम्हन कुठे ठेवावे. वगैरे जे लिहिलेले असते ते सर्व माणूस ताेंडाने म्हणत असताे आणि करीत असताे, कारण त्यामुळे त्याला कृती करणे साेपे जाते, तसे, आपण देवाचे करताे, परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून; आपल्याला देव आवडताे म्हणून नव्हे.
 
एक मुलगा हाेता, त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. ताे पत्र वाची आणि देव्हाऱ्यात ठेवून देई.दुसरे पत्र आले की ते वाची, आणि मागले पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतरकाही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि त्याला म्हणाला,‘‘तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का ?’’ त्यावर ताे म्हणाला,‘हाे.’ ‘‘अरे, मग पैसे का नाही पाठविलेस वडिलांना?’’ त्या गृहस्थाने विचारले. त्यावर ताे म्हणाला,‘‘तेवढेच राहिले बघा!’’ तसे आपले हाेते.आपण कृती करताे, पूज्य भाव वगैरे ठेवताे, परंतु सद्गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न हाेता, उलट अहंपणा वाढवायलाच मदत करतात.
 
म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे, संशयरहित हाेऊन करावे. त्याकरिता व्यवहार साेडण्याची जरूर नाही. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते.ताे लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असताे, आणि याेग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करताे; युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर साेडणे. त्याप्रमाणे, आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर, ताे सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते. आपण व्यवहारात गुंतू नये, पण व्यवहाराला साेडूही नये. ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे.‘मला’ भगवंताची गरज आहे आणि प्रपंचाला ‘माझी’ गरज आहे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दाेन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलाे की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच.
Powered By Sangraha 9.0