गीतेच्या गाभाऱ्यात

31 Mar 2023 14:51:59
 
 

Bhagvatgita 
 
बद्ध असला तरी मु्नत हाेण्याची पात्रता असल्यामुळे ताे बद्ध मु्नत आहे.‘‘सर्व खलु इदं ब्रह्म’’ या अद्धैत तत्त्वाप्रमाणे जगात नित्य वस्तू एकच आहे, आणि ती म्हणजे ब्रह्म अथवा परमेश्वर.महानुभव तत्त्वाप्रमाणे जीव परमेश्वराहून भिन्न असला पाहिजे. परिपूर्ण ईश्वराच्या ठिकाणी माया निर्माण झाली, असे म्हणणे म्हणजे आनंदातून दु:ख जन्माला आले किंवा अमृतातून विष उत्पन्न झाले, अथवा प्रकाशातून अंधार निर्माण झाला, असे मानण्यासारखे आहे, असे महानुभव तत्त्वज्ञानाला वाटते. या तत्त्वज्ञानाचे असे म्हणणे आहे की काेळिष्टकांनी आकाश व्यापले जाणे, हे जसे अश्नय आहे, त्याप्रमाणे परिपूर्ण ब्रह्माला मायेने व्यापणे अश्नय आहे.विवर्तवाद्यांचे असे म्हणणे आहे की, प्रपंच म्हणजे परमेश्वरावर झालेला भास हाेय. दाेरीवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास हाेताे किंवा शिंपल्यावर ज्याप्रमाणे रजताचा भास हाेताे, अथवा वाळवंटावर ज्याप्रमाणे मृगजळाचा भास हाेताे, त्याप्रमाणे परब्रह्मावर प्रपंचाचा भास हाेताे. प्रपंच हा मुळातच खाेटा व मिथ्या आहे.
 
हे तत्त्वज्ञान महानुभव तत्त्वज्ञानाला मान्य नाही. त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रपंच स्वतंत्र वस्तू आहे.तुला तत्त्वज्ञान जाणून घेण्याची फारच इच्छा झाली आहे.तुझी उत्सुकता भागविण्याच्या दृष्टीने तू आणखी असे लक्षात घे की, आपल्याकडे चार्वाक मुनींनी असा सिद्धांत केला आहे की, या जगात ईश्वर नाहीच. स्वर्ग, परलाेक वगैरे कल्पना झूट आहेत. पूर्वजन्म व पुनर्जन्म वगैरे खाेट्या कल्पना आहेत.
दृष्टीला दिसणारा व अनुभवाला येणारा भूमी, जल, अनल व अनिल यांचा जड प्रपंच एवढीच काय ती सत्य वस्तू हाेय, पण ती देखील नित्य नाही. मृत्यूबराेबरच जीवाचा शेवट असल्यामुळे मृत्यूनंतर हा देह पुन्हा परत येत नाही, म्हणून जिवंत असेपर्यंत कर्ज काढा, तूप प्या सुखाने जगा.अलीकडे डाॅ. जाेडचे तत्त्वज्ञान फार लाेकप्रिय झाले हाेते. त्याने पुष्कळ ग्रंथ लिहून असे दाखवून दिले की, या जगांत देव नाही.
Powered By Sangraha 9.0