पुष्कळ लाेकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की, जगातल्या सर्व दु:खांचे मूळ, देहदु:ख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यत: साठविलेले आहे. या दाेन गाेष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लाेकांना सुखी करता येईल असे वाटू लागले, आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की, आपण लंगाेटी घातलेली, जवळ पैसा नाही, आणि त्याचा लाेभही नाही.आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले, म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लाेभ उत्पन्न केला पाहिजे, तरच ताे मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न हाेईल; नंतर पैसा मिळविणे; आणि त्याच्यानंतर ताे गरजवंताला देणे.
पण हे करणे वाटते तितके साेपे नाही; कारण दुसऱ्याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जाे लाेभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला, ताेच पैसा साेडताना आपल्या आड येईल, आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारील. म्हणजे परिणाम असा हाेणार की, दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लाेभ उत्पन्न झाला. ह्यात दुसऱ्याचे काम तर नाहीच, आणि स्वत:चे मात्र नुकसान झाले. ुसरी बाब देहदु:खाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदु:खाची जाणीव हाेऊ शकत नाही. म्हणजे, दुसऱ्याचे देहदु:ख नाहीसे करावे अशी बुद्धी हाेण्याकरिता स्वत:च्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल. समजा, इतकेही केले आणि दुसऱ्याचे देहदु:ख निवारले, तरी त्याला पुन: देहदु:ख भाेगावे लागणारच नाही असे कसे हाेईल?
आज झालेली पाेटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे हाेऊ शकेल ? म्हणजे देहदु:ख कायमचे टाळता येत नाही, आणि पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी करता तर येत नाहीच, पण आपल्या स्वत:च्या ठिकाणी मात्र नसते दाेष उत्पन्न केल्यामुळे स्वत:ची अवनती केल्यासारखे हाेऊन नुकसान मात्र पदरात पडते.म्हणून रामाची प्रार्थना केली की, असल्या गाेष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकाेस. बालपणाची सरल वृत्ती नाहीशी व्हायला दाेन माेठी कारणे आहे. एक पैसा, आणि दुसरे विद्या. दाेन्हीपासून ‘मी कुणीतरी श्रेष्ठ आहे’ ही वृत्ती उत्पन्न हाेते, आणि ती घातक असते. जगातले अत्याचार, अनीती, अधर्म, असमाधान, या सर्वांचे कारण हेच की, मनुष्य जास्त लाेभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला ताे पाेटापुरता पैसा देताे, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देता