परमार्थात गुप्ततेची जरूरी असते

29 Mar 2023 15:51:48
 

Gondavlekar 
वासनेच्या तावडीतून सुटणे ार कठीण आहे, कारण वासनेच्या पाेटींच प्राणी जन्माला येत असताे.त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे. वासनेच्या पाेटी जन्म, आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जाेडप्यापाेटी कामक्राेधादी विकार जन्माला येतात.या जाेडप्याचे वैशिष्ट्य असे की, त्यामध्ये बायकाे नवऱ्यापेक्षा वडील असते; कारण आधी वासना, आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ ‘वास’ ठेवला तरच वासना नष्ट हाेते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते. त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते.
 
समजा, एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला, आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले; पण अट अशी घातली की, जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्या वेळी ते घालून खाेलीची दारेखिडक्या बंद करून आत बसले पाहिजे.अशी अट पाळून काेणती बाई दागिने घालायला कबूल हाेईल ? कारण दागिने लाेकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपले साधन काेणाच्याही नजरेस न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट ार लवकर लागते. ती केवळ इतर लाेकांचीच लागते असे नसून, आपली स्वत:चीसुद्धा लागण्याचा ार संभव असताे. म्हणून परमार्थात गुप्तता असावी; आणि आपल्या हातून जे साधन हाेते आहे ते सद्गुरु किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी.
 
आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गाेष्टी इतर लाेक करतात; औषध मात्र आपण स्वत:च घेतले पाहिजे. एखादा माेठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा राेग बरा हाेत नाही; त्याचप्रमाणे, परमार्थांत भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वत:लाच करायला पाहिजे.उगीच कुणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. काेणाला फसू नका, कारण स्वत: फसणे हे जगाला फसविण्याइतकेच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे. त्याचा ताे प्रपंचच परमार्थ हाेताे.उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थदेखील प्रपंचच म्हटला पाहिजे.
Powered By Sangraha 9.0