भगवंत जाेडत असेल तर अधर्मही करावा; भगवंत जाेडणे हाच एक धर्म.अभिमानाने काेणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पाेचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव हाेण्याकरिता जर केले, तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयाेग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढताे. बाभळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील? मीपणाने केलेले काम नाही उपयाेगी पडत, शरण बुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे.‘राम कर्ता’ असे म्हणावे; म्हणजे, देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा काेणत्याही वयात आणि काेणत्याही अवस्थेत वाढवता येते.ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही.
एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय? काळजीने कार्याचा नाश हाेताे आणि कर्तव्याचा विसर पडताे. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. व्यवहारात साैख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात साैख्य निष्ठेने मिळते. जिथे आळस माजला तिथे परमार्थ बुडाला. परमार्थ हा बावळ्या माणसाचा नाही, तसा ताे लबाड आणि भाेंदू माणसाचाही नाही. परमार्थ करणाऱ्याने काेणाचेही अंत:करण दुखवू नये, व्यवहारात कुणाला फसवू नये, आणि कशाला भुलू नये.व्यवहारात आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी. पण ‘काेणत्याही परिस्थितीत मी राहीन’ असे जाे म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये; अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे.
प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे, ही संपत्तीची समान वाटणी हाेय. माेबदला न देता आपण पैसा घेतला, तर ताे ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बराेबर येते. काय गंमत आहे बघा, इतर बाबतीत मुनष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करताे, पण ताे पैशाचे वचन देताे सहज आणि ते माेडताेही सहज; तेवढेच वचन पाळण्यात ताे कुचराई करताे. पैसा नसून अडते आणि ताे असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा.गृहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा; आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये. ‘मी कर्ता आहे’ ही प्रपंचातली पहिली पायरी तर ‘राम कर्ता आहे’ ही परमार्थातली पहिली पायरी.