एका हाताने करावे व दुसऱ्या हाताने भरावे असे म्हटले जाते. हे खरेच आहे.चाेरून लपून जरी वाईट केले तरी कधी ना कधी त्याचा दुष्परिणाम आपणाला भाेगावाच लागताे. आयुष्यभर लपवा लपवी केली तरी म्हातारपणी का हाेईना आपणाला आपल्या दुष्कृत्याच्या आठवणी सतावू लागतात. केलेले दुष्कृत्य आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. त्यामुळे मनावर एक प्रकारचे ओझे वाढते. डाेक्यावरील ओझे उतरवता येते पण मनावरील ओझे सहजासहजी उतरवता येत नाही. खरे म्हणजे दुष्कृत्य करून त्याचे परिणाम भाेगण्यापेक्षा सत्कर्म करून समाधानी हाेणे कधीही चांगले असते. आपण इतर प्राण्यापेक्षा अत्यंत भाग्यशाली आहाेत.
कारण आपणाला बुध्दी आहे. बुध्दीमुळे चांगल्या वाईटातील फरक आपणाला कळताे.आपल्या दुष्कृत्याची फळे, काळ आपणाला भाेगायलाच लावताे. आयुष्यभर दारू पिली असेल, बिडी-तंबाखूचे सेवन केले असेल, बाहेरख्याली झालाे असेल तर विविध आजार, एडस् आदिला सामाेरे जावे लागते. तारुण्यात चुकीच्या मार्गानी भाेगलेल्या आनंदापेक्षा म्हातारपणाच्या परावलंबी काळातील यातना कितीतरी पटीने जास्त क्लेषकारक असतात. याची आठवण ठेवून जगणे हितावह असते.
जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448