पुष्कळ लाेकांना खूप सम जून घ्यावे, ज्ञान संपादन करावे, असा हव्यास असताे आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही.थाेडी अू पचनी पडली की, कैफ येत नाही म्हणून ताे आणखी अू कैफ येईपर्यंत खाताे. असे हाेता हाेता अधिकाधिक अू पचनी पडत जाते, आणि शेवटी इतकी अू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत हाेताे.असेच ज्ञानसंपादनाच्या हव्यासाचे आहे; म्हणून, थाेडेच वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे. नाही तर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जाताे आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही.
मनुष्याला पाेटभर जेवायला पंचवीस-तीस मिनिटे पुरेशी हाेतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन हाेण्यासाठी पाचसहा तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण हाेऊन तब्येत बिघडेल, आणि त्यातच त्याचा अंत हाेईल. म्हणून नुसते वाचीतच बसू नये. थाेडेच वाचावे, पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती हाेत नसून, ते कृतीत आणण्याने प्रगती हाेते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतींत आणण्यावर भर असावा. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहाेत ते नि:स्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदान्ताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान सफल हाेणार नाही; त्यासाठी साधना करायला पाहिजे.
जग सुधारायच्या नादी लागू नका, स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलाे नाही तर मग जग सुधारले नाहीच! वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानताे. याचा परिणाम असा हाेताे की, वस्तूच्या साहाय्याने सुख मिळविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्तीत जास्त मिळविण्याच्या मागे लागताे, आणि शेवटी दुःखी बनताे. कर्माला सुरूवात करताना, फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख हाेते; कर्म संपून, फळ मिळाले नाही तर दुःख हाेते, आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न हाेऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख हाेते.सारांश, अथपासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडते.यासाठी फळाची अपेक्षा साेडून कर्म करू लागलाे की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त हाेते.म्हणून परमार्थामध्ये राेकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असे सर्व संतांचे सांगणे आहे.