ज्याला सत्याचे ज्ञान झाले ताे सर्वज्ञच बनला; आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत हाेत, संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येताे, आणि आपण संतांना नावे ठेवताे. एकजण संतांना उद्देशून म्हणाला, ‘अपकार करणारावरही उपकार करायला सांगून तुम्ही आम्हाला मेषमात्र करता; तुम्ही आमचे नुकसान करता,’ वास्तविक आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे. त्यांच्या कर्मांमुळेच तर आज आपण हिंदू म्हणून जगताे आहाेत. पण त्यांच्या आणि आपल्या कर्मामध्ये फरक आहे, ‘राम कर्ता’ या भावनेने त्यांनी कर्म केले; आपण मीपणाने ते करताे, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते.
एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयाेग ?
आपल्याला जगाचे खरे स्वरूप समजायला हवे असेल तर, जाे सुखदु:खाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे. ताे साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्तच राहाताे. फळाची आशा ठेवीत नसल्यामुळे, कर्म करूनही ताे अलिप्त राहाताे. आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जाताे. संताचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याची शिव्यांची भाषासुद्धा न बाेचणारी, किंबहुना आशीर्वादरूपच ठरते. सत्पुरूष लाैकिकदृष्ट्या विद्वान असतातच असे नाही; उलट, अतिविद्वान माणूस सत्पुरुष झाल्याची उदाहरणे विरळाच. कुणी आठव्या वर्षीच घरातून निघून जाताे, तर कुणी लग्नातून पळून जाताे, तर कुणाला लिहायला-वाचायलाही येत नाही, असे लाेक सत्पुरुष झालेले आढळतात. संतांनी देह साेडल्यावर सुद्धा लाेकांना त्यांचे अस्तित्त्व भासते.लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण हाेऊन ते तिच्याकडे धावते.
याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याचीनिष्ठा, आपल्याजवळ पाहिजे.भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनताे.त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की ताे निवांत हाेताे.संत हे खराेखर आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि ताे आपल्याला सुसेव्य केला; परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे साेपे साधन दिले; एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, असे साेपे सद्ग्रंथ निर्माण केले; आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले.