जगात वाईट गाेष्टी आहेत; पण का ? कारण चांगले लाेक आपली जबाबदारी झटकून एकांतवासी हाेत आहेत.आपली मान-प्रतिष्ठा आणि नाव वाचविण्यासाठी हे चांगले लाेक वाईट लाेकांकरिता खुर्ची खाली करत आहेत.चांगले लाेक जर त्यावर बसणार नसतील, तर ती वाईट लाेकांच्या ताब्यात जाणारच आणि मग नियंत्रणाची दाेरी त्यांच्याच हाती जाणार ना ! या देशात आज हेच घडतंय. त्याचा परिणाम सर्वांच्या समाेर आहे. दरराेज सकाळी ही एक छाेटीशी प्रार्थना म्हणत चला : हे प्रभू ! माझे पाय लुळ्या-पांगळ्यांचे पाय बनाेत.