आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही.बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले, तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते.सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खाेली असते तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जाेडण्यासाठी, आपल्या हृदयातले साम ान, म्हणजे विषय, खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की, एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येताे; म्हणून जी वस्तू आपल्याला वस्तू एकच आहे; ती म्हणजे भगवंत हाेय.राजाने आपल्या नावाचा शिक्का केला, आणि जाे अति प्रामाणिक हाेता त्याच्याजवळ दिला; त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले.
त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही; पण फरक आहे ताे हा की, संत हा जसे बाेलताे तसे वागताे, तर आपण बाेलताे चांगले आणि वागताे मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड काेणी आले की आपण वाईट बाेलताे. ज्याच्यावर आपण प्रेम करताे त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवताे. आपण नुसती नीतीची तत्त्वे जेव्हा सांगताे तेव्हा अगदी चांगले बाेलताे; पण वागताना मात्र उलट वागताे.अगदी नास्तिक जरी झाला तरी त्याला हे कबूल करावे लागेल की, ‘मला जेवढे कळले आहे त्याच्या पलीकडे आणखी जगत् आहे.’ त्याला संत सांगताे की, ‘मी दाखविताे त्या मार्गाने जर तू गेलास तर मी जे पाहिले ते तुलाही दिसेल.’ गाडीत बसायला मिळावे म्हणून
काही काेणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनवर जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेताे; तसा माेठमाेठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु ताे सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणाऱ्या माणसाला जसा दाेरीचा आधार द्यावा, त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागताे, त्याचप्रमाणे संताजवळ राहाताे ताेही संतच बनताे. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे. गुरू परीक्षेकरिता नाना तऱ्हेच्या आज्ञा करतात. ज्याला देह बाजूला ठेवून राहता येते त्यालाच गुरु-आज्ञा खरी पालन करता येईल.