सत्संगतीच्या याेगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही

14 Feb 2023 16:31:41
 
 

Gondavlekar 
संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते; ते बाेलतील ते खरे हाेते. वाचासिद्धि म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयाेग आपणसुद्धा करून घेऊ शकताे; परंतु भगवत्सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा, तसे हे हाेते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून, वाटेने घाेडा येत हाेता ताे घेतला आणि कामधेनू देऊन टाकली, तशासारखे हाेते.जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे? हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणार; मग ते घेऊन काय करायचे? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूंत आपले मन किती गुंतून राहते ! पैशाचे नाव अर्थ, पण ताे करताे माेठा अनर्थ.
 
पैसा हा भुतासारखा आहे. त्याच्याकडून काम करवून घेतले तर ताे ार उपयाेगी आहे, पण ते न केले तर ताे उरावर बसताे. आपण प्रापंचिक माणसे! आपण पैसा साठविला तर गैर नाही. पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे हाेय. आपल्याजवळचा पैसा आपण हाेऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही. पण चाेराने ताे चाेरून नेला तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आला तर त्याला ‘नाही’ म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा. म्हणजे किती? तर पेन्शन असेल त्यांना राेजच्यानिर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला; आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा-पंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा इतका असला म्हणजे पुरेसा झाला.
 
याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस्स झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागताे असे थाेडेच आहे? आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे! पैशाच्या बाबतींत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर हाेईल तसे हाेऊ द्यावे. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी कधीही बुद्धी ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे, त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल; ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान् म्हणता येईल; ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल.
 
परंतु यांच्यापैकी काेणाला माेठा म्हणता येईलच असे नाही. सावकार कंजूष असेल, विद्वान् गर्विष्ठ असेल, किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल.ज्याच्याजवळ सर्व गुण एकसमयावच्छेदेकरून असतील ताेच खरा माेठा हाेय. सर्व गुण एक भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील. म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे माेठे बनतात. अशा लाेकांना संत म्हणतात. आपण संतांचे हाेऊन राहावे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्वासना प्राप्त हाेतात.ज्याचे विचार चांगले ताे मनुष्य खरा चांगला हाेय; आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती हाेय.
Powered By Sangraha 9.0