प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे

04 Jan 2023 14:32:32
 
 

Gondavelakr 
आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्ताने भगवन्नामांत कर्तव्य करीत राहावे. काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही, कारण ती आपल्या काळजापर्यंत, नव्हे काळजापाशीच असते. काळजी करायचीच म्हटले म्हणजे काेणच्याच गाेष्टी तिच्यातून सुटत नाहीत.काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास हाेताे. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून, तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा.ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली तरी, मग ताे श्रीमंत असाे की गरीब असाे, तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच, त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच.भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधु-पुरुष जरी झाले, तरी त्यांनाही विकार असतातच. अर्थात् त्या विकारांच्या बराेबर प्रेम, दया, शांती, क्षमा हे गुणही त्यांच्या अंगी असतात. ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मांपासून आलेले असतात. या विकारांना वश न हाेता, म्हणजेच त्यांचे नियमन करून, गुणांचे संवर्धन करणे हे प्रपंचामनुष्याला शिकायचे असते. कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे.
 
ज्याला स्वत:च्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की, आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही, ताे बाप खरा. ज्याला अशी उत्सुकता असते की, वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे, ताे मुलगा खरा.बापाचा पैसा हा मुलाने अनीतिने वागण्यासाठी नाही.जाे मुलगा अनीतिने वागताे, त्याला बापाने पैसा देऊ नये. ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मांड पाहून घाेडा दांडगाई करताे, त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागताे.गृहिणीने स्वत: स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावे; त्या करण्यामध्ये प्रेम असते. प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थाेडे तरी काम पाहिजेच. खराेखर, विवाहामध्ये बंधने ार आहेत, कारण ती अत्यंत पवित्र गाेष्ट आहे. जाे मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीतिनियमानुसार वागेल, त्याला म्हातारपण मुळीच दु:खदायक हाेणार नाही. आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच. भगवंत राेज संधी देताे आहे.आज सुधारले आणि कालचे पुन: केले नाही, म्हणजे पूर्वीचे नाहीसे हाेते, हीच संधी.
Powered By Sangraha 9.0