नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले, ‘तुम्ही कुठे सापडाल?’ त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, ‘नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन.’ भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला देवपण तरी कुणी आणले? भक्त नाहीत, तर देव तरी कुठचे आले? देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते.नास्तिकाला देव कुठला? त्याला विचारले, ‘तुझे काेण आहे या जगात?’ तर ताे सांगेल,‘ हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ, बहीण, बायकाे, मुले, वगैरे नातेवाईक, तसेच प्रपंचात ज्या काही गाेष्टी लागतात, त्या सर्व माझ्या आहेत.’ मग देवाघरची वाट काय? ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे, आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे, हा परमार्थ हाेईल काय?
तेव्हा, ‘देव आहे’ अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा, म्हणजे ताे सदा सर्वकाळ तुमच्या जवळच आहे. भावनेने देव आपलासा केला पाहिजे. आपण कुठेही गेलाे, तरी आपल्या रामाला बराेबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भीती नाही. ‘रामाला बराेबर नेणे’ हे बाेलणे लाेकांना चमत्कारिक वाटेल, पण ज्यांना देवच नाही असे वाटते, त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही.जाे देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला, असे काहीजण म्हणतात; परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला, त्याला विसरून ताे प्रपंच नीट हाेईल का? कधीही हाेणे शक्य नाही, तर त्याला स्मरून प्रपंच केल्यानेच ताे नीटनेटका हाेईल.प्रपंच साेडून परमार्थ हाेणार नाही; प्रपंच करा, पण त्यातली आसक्ती साेडा म्हणजे झाले. तुम्हा सर्वांना जडभरताची गाेष्ट माहीत आहेच.
भरत जरी सर्व घरदार साेडून वनात गेला, तरी तिथे हरणांची आसक्ती धरलीच! तर हरीण काय आणि माणसे काय, आसक्तीच्या दृष्टीने दाेन्ही सारखीच.जाेपर्यंत आसक्ती सुटली नाही, ताेपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ हाेय. तरी आसक्ती साेडण्याचा प्रयत्न करा आणि राम सदा सर्वकाळ माझ्या मागेपुढे आहे ही भावना धरा. एकाने विचारले, ‘तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्याजवळ कसा जाणार?’ मी त्याला सांगितले, ‘तू मानसपूजा कर म्हणजे तुझ्या जवळ ताे राहील.’ ताे जर सर्व ठिकाणी भरलेला आहे, तर त्याला जाणे-येणे नाहीच! आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे. भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दाेन्हीकडे उजेड पडेल