नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग

28 Dec 2022 14:50:46
 
 

Gondavelakr 
 
सर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे; पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खराेखर भगवत्कृपाच पाहिजे.आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गाैण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गाैण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.याेगात, याेग करीपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते.स्वत: निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना हाेत नाही.तेज दिसणे, नाद ऐकणे, या सर्व गाेष्टी गुणातच नाही का आल्या? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूती पाहणे ही निर्गुण उपासनाच हाेय.याेग नामस्मरणाला पाेषक तितकाच करावा; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. याेग नामस्मरणाला पाेषक आहे, पण नामस्मरण याेगाच्या पलीकडे आहे; म्हणून नामस्मरणात याेग येताे, याेगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे.
 
नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने साेडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पाेचवते. इत साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थाेडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायम साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा हाेते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग हाेय. नामांत एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही.नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वत:ला विसरेल. तुकारामबुवांना वाचा अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली; याचा अर्थ असा की, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे.
 
आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य हाेणे ही भगवंताची कृपा हाेय.चार माणसे हाेती, त्या सर्वांना एकच राेग झाला हाेता. पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती.वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले, त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधांत घ्यायला सांगितले, त्याच्याहीपेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरामध्ये घ्यायला सांगितले, आणि जाे सर्वात श्रीमंत हाेता त्याला तेच औषध कस्तुरीमध्ये घ्यायला सांगितले.त्याचप्रमाणे, ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते ताेंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे, नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशा दृढ भावनेने घ्यावे; सर्वांना फळ सारखेच मिळेल.
Powered By Sangraha 9.0