धन काही नेहमीच आपल्याजवळ राहू शकणार नाही. म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करा की, हे देवा! मला ज्या वेळी संपत्ती देशील, तेव्हा त्यासाेबत सुबुद्धीही दे. कारण सुबुद्धी जर असेल, तर संपत्ती मला घसरू देणार नाही.पुण्य हा लक्ष्मीचा भाऊ आहे. जिथे सुकृत कार्ये हाेतात, तिथे पुण्यप्राप्ती हाेते आणि तिथेच लक्ष्मीचा वास असताे. धन विहिरीच्या पाण्यासमान आहे. विहिरीतले पाणी बाहेर काढले नाही, तर पिण्यायाेग्य राहात नाही.