नाम निष्ठेने घ्यावे म्हणजे ते भगवंतापर्यंत पाेचते

16 Dec 2022 16:30:01
 

Gondavleakar 
नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय? तर आपल्या सद्गुरूंनी, किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला नितांत पूज्यभाव वाटताे अशा व्यक्तीने सांगितले आहे, म्हणून दृढ विश्वासाने ते घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही. शंका अनेक तऱ्हेच्या असतात.नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयाेग आहे की नाही, नाम घेताना काेणती बैठक असावी, दृष्टी कशी असावी, आपण जे नाम घेताे ते भगवंतापर्यंत पाेचते की नाही. भगवंत आणि त्याचे नाम हे एकरूपच असल्यामुळे त्या दाेहाेंच्या आड काहीच येऊ शकत नाही. आपण असे पाहताे की, एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललाे असताना आपल्या ताेंडून त्याचे नाव निघाले, तर ताे लगेच मागे वळून बघताे. ही जर मनुष्याची स्थिती, तर भगवंताचे नाम तेवढे त्याच्यापर्यंत पाेचत नाही हे कसे शक्य आहे?
 
खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते; म्हणजे त्याचे नाव ताेच घेत असताे; मग नाम भगवंतापर्यंत पाेचते की नाही ह्या शंकेला वावच कुठे राहिला? समजा, दाेन माणसे जेवायला बसली. त्यातल्या एकाच्या मनात काही विचार घाेळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने ताेंडात एकेक घास घालण्याचे काम चालू हाेते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण करत हाेता. दाेघेही जेवून उठले, तर ह्यात उपाशी काेण राहिला? दाेघांचीही पाेटे भरलीच! तसे, नाम घेतल्यानंतर त्याचा उपयाेग झाला नाही, असे कसे हाेईल? समजा, आपण परगावच्या एका अनाेळखी इसमाला पत्र लिहून त्याला बाेलाविले; ताे आला आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठविले ताेच मी; तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करताे.
 
तसे भगवंताने सांगितले आहे की, ‘जेथे माझे नाम तेथे मी पुरुषाेत्तम’ तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच पाहावे, असे का करता येऊ नये? हीच श्रद्धा. आपण भगवंताच्याच नावाने जगावे; म्हणजे, माझा सर्व कर्ता, रक्षिता, ताे एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कुणीही नाही, या भावनेने राहावे.आपण एखादा व्यापार केला, तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा ना असताे. त्याचप्रमाणे प्रपंचातला ना म्हणजे, ‘भगवंताकडे आपले लक्ष किती लागले’ हा हाेय. भगवंताला अशी प्रार्थना करावी की, ‘भगवंता, माझे हित मला कळत नाही, तुझ्या इच्छेने वागण्याची बुद्धी मला दे.’ लहान मुलाला बापाइतके उंच हाेण्याची इच्छा झाली तरी ते त्याला शक्य नसते; त्यावेळी बापच त्याला उचलून वर घेताे, ते इतके की, त्या मुलाची उंची बापाच्या उंचीपेक्षाही जास्त हाेते; तसे जाे भगवंताचा झाला, त्याचे महत्त्व भगवंत स्वत:पेक्षाही जास्त वाढविता
Powered By Sangraha 9.0