देवाच्या आड काय बरे येत असते? आपल्याला देवाची प्राप्ती हाेत नाही याला वास्तविक आपणच कारण असताे. आपण लाेकांना त्याबद्दल दाेष देत असताे, पण इतर लाेक त्याच्या आड येत नसून आपणस्वत:च आड येत असताे, हे थाेडा विचार केला असताना समजून येईल. ज्याला आपण आपले म्हणायला पाहिजे हाेते, त्याला न म्हणता आपण दुसऱ्याच कुणाला तरी आपले म्हणत असताे; आपला मुलगा, बायकाे, भाऊ, या सर्वांना आपले म्हणत असताे.हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात; परंतु देवाला जर आपण आपले म्हटले तर ताे सदासर्वकाळ आपलाच असताे, आणि आपल्याला ताे मदत करायला तयार असताे. तुम्हा सर्वांना द्राैपदीची गाेष्ट माहीत आहे ना? आपले भ्रतार आपले रक्षण करतील असे तिला वाटत हाेते.
परंतु त्या काेणाकडून काही हाेणे शक्य नाही असे तिला दिसले तेव्हा तिने अनन्यतेने धावा केला तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरिता धावून आले. म्हणजे काय, की आपण ज्याला आपले म्हणत असताे ते खरे आपले नसून, आपण परमात्म्याला आपले म्हणावे.‘मी त्याचा आहे’ अशी सदासर्वकाळ आठवण ठेवावी, आणि जे-जे घडत असते ते-ते सर्व त्याच्याच इच्छेने हाेत असते ही भावना ठेवावी.अशी भावना हाेण्याकरिता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणे म्हणजे तरी काय?? आपण देवाचे आहाेत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहाेत, असे वाटणे. असे वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरणात राहणे जरूर आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिले म्हणजे ताे सदासर्वकाळ आपल्याजवळ राहाताे. तुम्ही कुणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते, त्याप्रमाणे देवाचे नाव घेतलेत म्हणजे ताे तुमच्याजवळ असताे.
देव कसा आहे हे विचारले तर कसे सांगता येईल? तर ताे नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच सांगितले आहे. नाम हेच त्याचे रूप, म्हणून नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणेच भाग पडते.हे नामस्मरण कसे करावे? समर्थांनी सांगितले आहे की,‘काहीच न करूनि प्राणी। रामनाम जपे वाणी। तेणे संतुष्ट चक्रपाणी। भक्तालागी सांभाळी।।’ आपण नाम घेताना काहीच करीत नाही का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करीत असताेच ना? म्हणजेच आपण त्यावेळी आपला मीपणा ठेवून नामस्मरण करीत असताे! मीपणारहित जाे नामस्मरण करील त्यालाच देव सांभाळीत असताे, आणि असा जाे स्वस्थ राहील त्याचा याेगक्षेम देव चालवीत असताे.