संताचे दर्शन झाले, पण त्याच्या आजूबाजूचे लाेक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलाे तर निराेगी लाेक आपल्याला तिथे कसे दिसतील? आमची प्रपंचाची नड संतांनी दूर करावी हे म्हणणे चुकीचे नाही का? ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे, संताकडे नव्हे. आता, दुखणे बरे व्हावे म्हणून जरी ‘राम राम’ म्हटले तरीसुद्धा ते वाया जात नाही हे निराळे. खराेखर, परमार्थ हा अनुमानाचा नाही. पण आपण नुसते बाेलताे, कृती काहीच करीत नाही, म्हणून ताे आपल्या आवाक्याबाहेर आहे असे आपल्याला वाटते. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा रहा म्हणून सांगितले, अर्जुन सबबी सांगू लागला.
देवाला ार वाईट वाटले. देहबुद्धीमुळे, अभिमानामुळे, आज्ञेला सबबी येतात. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जाताे, आणि काशीस जायचे तर याेग येत नाही असे म्हणताे! व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला ार सवय झाली आहे. आज्ञेला सबब सांगणे हे माेठे पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितले की, तुझ्याजवळचे सर्व काही देऊन टाक, तर ताे कदाचित देईलही, पण मी दिले ही आठवण नाही जाणार त्याची. जाे द्यायला सांगताे ताे दाता असताे, हे ताे विसरताे.व्यापाऱ्याला स्वप्न व्यापाराचेच पडते, त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचे प्रेम येते.भगवंताविषयीचे प्रेम कसे उत्पन्न हाेईल हे पाहावे.
प्रल्हादाच्या वेळेस देवपण सवंग हाेते असे आपण म्हणताे, पण त्याने नाम किती अट्टहासाने घेतले हे विसरताे. सहवासाने, निश्चयाने, आपलेपणा विसरण्याने परमेश्वराचे प्रेम येते. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम आले? नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झाले तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते; म्हणजेच, प्रेम निश्चयाने येऊ शकते. ज्ञानमार्ग असाे किंवा भक्तिमार्ग असाे, खरा ‘मी’ काेण आहे हे ओळखण्यासाठी सर्व साधने असतात. आज आपल्याजवळ खाेट्या ‘मी’ चे प्राबल्य आहे. ते नाहीसे करणे जरूर आहे.खाेटा ‘मी’ गेला म्हणजे खऱ्या ‘मी’ ला कुठून आणायची जरूरी नाही, ताे प्रत्येकाच्या अंत:करणामध्ये स्वत: सिद्ध आहेच. म्हणून खाेट्या ‘मी’ ला मारण्यासाठी भगवंताचे (जगाचे नव्हे)दास्यत्व पत्करणे ार अवश्य असते. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ती जन्म पावते नामस्मरण हे भक्तिमार्गाचे मुख्य साधन आहे. ते तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या, हे माझे सांगणे आहे.