प्रपंचासाठी भगवंत हा साधन बनवू नये

25 Nov 2022 14:44:16
 
 
 

gondavelakr 
 
एक मुलगा घरातून पळून गेला.तेव्हा त्याची आई म्हणाली, ‘ताे कुठेही राहू दे, पण खुशाल असू दे.’ तसे, तुम्ही कुठेही राहा पण नामात असा.नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे, वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे! वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध घालावा लागताे, काहीमध्ये दूध, तूप किंवा पाणी घालावे लागते.तसे भगवंताचे प्रेम लाभण्यासाठी व नामात गाेडी उत्पन्न हाेण्यासाठी त्या नामामध्ये थाेडी श्रद्धा घाला. ‘मी ब्रह्म आहे’ या अनुभवातसुद्धा मीपणा आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे, म्हणून भगवंताच्या नामाचे सतत स्मरण ठेवावे; त्यामुळे प्रपंच साेपा जाताे.
 
नामाची सत्ता ार बलवत्तर आहे. जगात असे काेणतेही पाप नाही की जे नामासमाेर राहू शकेल. नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच. रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम साेडू नये, पुढे रूप आपाेआप येऊ लागेल. सत्याला काही तरी रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे.भगवंताच्या नामात माेबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते अपूर्ण नाही. अडाणी लाेकांना नाम घ्यायला सांगितले तर ते लगेच घेणे चालू करतात, परंतु विद्वान लाेक मात्र ‘नामाचे प्रेम असेल तरच मी नाम घेईन’ असे म्हणतात. विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्याने भगवंताचे अमृतासारखे गाेड नाम आपल्याला गाेड लागत नाही. याकरिता या क्षणापासूनच नाम घ्यायला सुरुवात करावी. मूर्खाने न बाेलण्यात शहाणपण आहे, तसे आपण न बाेलता रामाचे व्हावे व त्याला जे आवडते ते करावे.
 
रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेणतेपणाने शरण जावे. भगवंताला अनन्य शरण जा, ताे तुम्हाला तारील. शरण जाऊन अनुभव घ्यावा. नीतीने वागावे, भक्ती चांगली करावी, मग राम प्रसन्न हाेताे.ज्ञान श्रेष्ठ खरे, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही; कारण भगवंताहून कधी विभक्त नसताे ताे भक्त हाेय, आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असते; म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न हाेते आणि ते भक्तीवरच जगते. खरा भक्त ज्ञानीच असताे. भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच असताे. खरी भक्ती ती हीच समजावी. नामाकरिता आपण नाम घ्यावे.राम ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये, ताे साध्य असावा. जाे भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय करील, त्याने जन्माला येऊन सर्व काही साधले व जन्माचे सार्थक करून घेतले.
Powered By Sangraha 9.0