चाणक्यनीती

18 Oct 2022 13:53:29
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : ज्या माता- पित्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले नाही, ते आपल्या मुलाचे वैरीच हाेत; कारण ज्याप्रमाणे हंसाच्या समूहात बगळा शाेभत नाही, त्याचप्रमाणे विद्वानांच्या सभेत असा अज्ञानी मुलगा शाेभत नाही.
 
भावार्थ : चाण्नयांनी हंस आणि बगळा यांची तुलना करून ज्ञानी आणि अज्ञानी (अडाणी) यातील फरक दाखविला आहे.
1 हंस : राजहंस हा पक्षी माेहक पांढराशुभ्र, कमनीय असा असताे. आकाशात उडताना, पाण्यात पाेहताना त्याच्या हालचाली फार डाैलदार, आकर्षक असतात. पाेहताना तर ताे इत्नया काैशल्याने पुढे जाताे की, पाण्यात फ्नत वलय उठतात; पण त्यांची हालचाल इतकी सहज असते की, ताे जणू तरंगत जाताेय असे वाटावे. हंस हे सर्वाेत्कृष्टतेचे प्रतीक मानले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे, ‘राजहंसाचे चालणे जगी जाहलेसे शहाणे...’
Powered By Sangraha 9.0