परमेश्वराच्या भ्नतीचा राजमार्ग

17 Oct 2022 16:34:36
 
 

Gondavlekar 
 
परमात्म्याची ज्याने ओळख हाेते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच हाेय.परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही, भक्ती केल्यानेच ताे ओळखता येईल जसे गाय आली म्हणजे तिच्यामागाेमाग तिचे वासरू येते, त्याला निराळे बाेलवावे लागत नाही, त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपाेआपच मागे येते. आता, भक्ती कशी करावी हे पाहिले पाहिजे. जाे देवापासून विभक्त राहात नाही ताे भक्त. नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त हाेत नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी हाेणे. सुखात ठेवले तर आसक्तीशिवाय राहिले म्हणजे झाले.वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच साेडावा लागत नाही.
 
साधुसंत प्रपंच साेडून राहात नाहीत, किंबहुना, ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात; पण मनांतून त्यांना त्यात आसक्ती नसते. मनाने आतून जाे आसक्तिरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे हाेते. अंगाला राख ासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही; तर देह प्रारब्धावर, भगवंताच्या भरंवशावर, टाकून राहणे हेच वैराग्य हाेय. कशाचीही हाव न धरता, जी स्थिती प्राप्त हाेईल तींतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे हाेय; आणि तसे राहिले म्हणजे आपाेआपच भक्त हाेताे. तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे.नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे. गुरूने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे आणि त्यातच त्याला पाहावे, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते.
 
असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरू दिसू लागताे; चांगल्या दिवाणखान्यात असलाे म्हणजे गुरू दिसताे आणि वाईट ठिकाणी असलाे तर ताे दिसत नाही असे नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहात नाही, कारण मग वाईटाला जागाच राहात नाही.नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे. दुसऱ्या कुणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य; त्यावर इतका विश्वास ठेवा की, त्याशिवाय जगात दुसरे काही नाही. एवढा विश्वास अंगी बाणल्यावर देव काही लांब नाही, तुमच्याजवळच आहे.प्रपंचावर जी आस्नती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे हाेय. मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरूने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जाताे.म्हणून सतत नामस्मरण करीत असावे म्हणजे गुरुकृपा हाेईल.
Powered By Sangraha 9.0