वाच्यार्थ : मनुष्य स्वत:च कर्म करून त्याचे फळ भाेगताे, ताेच जन्म-मृत्यूच्या ेऱ्यात अडकताे आणि ताेच या ेऱ्यातून मुक्तही हाेताे.
भावार्थ : आपल्या कर्माचे उत्तरदायी आपणच असताे.
1. कर्म : माणसाला परमेश्वराने, सदसद्विवेकबुद्धी दिली आहे. त्यामुळे त्याला चांगले आणि वाईट कर्म काेणते, हे नीट समजते.चांगले कर्म केल्यास आत्म्याची उन्नती हाेते आणि वाईट कर्म केल्यास अधाेगती हाेते.(नाेकरीत ज्याप्रमाणे ‘प्रमाेशन’ किंवा ‘डिमाेशन’ असते त्याप्रमाणे.) चाैऱ्याएेंशी लक्ष याेनीतून आत्मा भ्रमण करताे, असे समजले जाते.क्रियाशील राहून चांगली कर्मे करत गेल्यास ताे पुढे चांगले जीवन मिळवत जाताे.