गीतेच्या गाभाऱ्यात

    29-Jul-2023
Total Views |
 
 
 

Bhagvatgita 
पत्र पंचविसावे दुर्याेधनाचे आता म्हणणे काय आहे हे समजून घेण्याकरिता मला वाटते आपण एखादा धर्मशील हुशार असा दूत सलाेखा करण्याकरिता व धर्मराजाला अर्धे राज्य मिळण्याकरिता काैरवांच्याकडे पाठवावा-’’ तुला माहीत असेल की, काैरव व पांडव यांच्यामध्ये राज्याची निम्मी निम्मी वाटणी झाली हाेती. मग पांडवांनी स्वपराक्रमाने आणखी बरेच राज्य मिळवले. तेरा वर्षानंतर पांडवांचे जेवढे राज्य हाेते(निम्मे राज्य व स्वसंपादित राज्य) पांडवांना परत मिळावयाचे हाेते. असे दिसते की वडिलाेपार्जित राज्यावर पाणी साेडण्यास पांडव तयार हाेते. दुर्याेधनाचा लाेभीपणा जाणून व युद्ध टाळण्याकरता फ्नत स्वसंपादित राज्यावर पांडव खुश हाेते.
त्या सभेमध्ये कृष्णाचे भाषण झाल्यावर बलराम बाेलू लागला. ताे म्हणाला- ‘‘काैरव सरळ वागून निम्मे राज्य पांडवांना देतील तर पांडवांनी संतुष्ट रहावे.
 
कृष्णाने म्हटल्याप्रमाणे काेणीतरी दूत काैरवांच्याकडे जाऊ दे. पण मला वाटते त्या दूताने काैरवांना चिडवू नये. कारण काैरवांनी आपल्या हिकमतीने पांडवांचे राज्य हरण केले आहे, तेव्हा त्यांना बाेल लावणे गैर आहे.म्हणून दुर्याेधनाशी सामाेपचाराने बाेलावे, व युद्धाने फायदा हाेणार नाही हे ध्यानात धरावे-’’ तू हे बलरामाचे भाषण नीट समजून घे. गीता भीष्मपर्वात आहे पण त्या पर्वापेक्षा उद्याेगपर्वाला जास्त महत्त्व आहे.‘भारते सारं उद्याेगपर्वम्’ असे म्हटले आहे.अन्यायाने द्यूतात जिंकल्यानंतर पांडवांनी जर एकदम उठाव केला असता, तर किती तरी राजे लाेक त्यांच्या बाजूने उभे राहिले असते पण तेरा वर्षाच्या काळानंतर परिस्थिती पालटली हाेती. सत्तेच्या जाेरावर दुर्याेधनाने आपली बाजू बळकट केली हाेती. तेरा वर्षापूर्वी पांडवांच्यावर जाे अन्याय झाला हाेता त्यामुळे लाेक संतप्त हाेते पण आता अन्यायाची जाणीव पुसट झाली हाेती.अग एवढा माेठा बलराम पण त्याच्या वृत्तीमध्ये केवढे अंतर पडले पहा. पांडवांच्यावर अन्याय हाेऊन ते वनवासात गेल्यावर वनपर्वात बलराम जे भाषण करताे ते ह्या दृष्टीने पाहण्यासारखे आहे.
 
ताे म्हणताे- ‘‘दुर्याेधनाचे पाप एवढे माेठे आहे की पृथ्वी त्याला गिळून का टाकत नाही व जगू कशी देते हेच मला समजत नाही. त्या पापामुळे पृथ्वी विदीर्ण का हाेत नाही?’’ वनपर्वात असे बाेलणारा बलराम तेरा वर्षांनंतर उद्याेगपर्वात वरीलप्रमाणे बाेलला.अग, तेरा वर्षांच्या काळामध्ये दुष्ट दुर्याेधनाने केवढी क्रांती केली हाेती, ते त्या भाषणावरून तुला कळून येईल. तू असे लक्षांत घे कीज्याच्या हातात राज्य-सत्ता असते ताे स्वार्थी अन्यायी असला तरी ताे आपल्या कृत्यावर न्यायाचा मुलामा चढवू शकताे व लाेक देखील त्याचे गुणगान करू लागतात. जग हे असेच आहे.बलरामाचे भाषण उद्याेगपर्वाच्या दुसऱ्या अध्यायात आले आहे. त्या भाषणामुळे सात्यकी संतापला. त्याचे भाषण तिसऱ्या अध्यायांत आहे. ताे म्हणताे.- ‘‘बलरामा, जसे तुझे अंतरंग तसे तुझे बाेल. धर्मराजाला थाेडासुद्धा दाेष देणाऱ्याना त्या सभेत बाेलू कसे दिले जाते? काैरव दुष्ट आहेत. खरं पाहिलं तर सर्वच राज्य पंडूचे म्हणून पांडवांचे; काैरवांचा त्यावर ह्नकच नाही. पांडवांनी अज्ञातवास पुरा केला आहे.