भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येताे, परिस्थिती आड येत नाही.ती व्यसनाच्या आड कुठे येते? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे. ताेच कर्ता, आपण काहीच करीत नाही, अशी भावना ठेवावी; म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बाेलावे; त्याचे नाम घ्यावे; नामासारखे दुसरे खरे साधन नाही. एकदा ज्याला नामाची गाेडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते, इतके विषय त्याला कडू वाटू लागतात. परमात्म्याच्या नामाने संसार बिघडताे हे म्हणणे चुकीचे आहे. नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग साेडू नये. नामाची गाेडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात. नामात प्रेम येईल असे करावे.
नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खाेटे आहे; आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही. जन्माला आल्यासारखे नामाचे हाेऊन राहावे.भगवंत आपल्या नामस्मरणात आहे. वाचेने खरे वा खाेटेही बाेलता येते, पण खऱ्याकरिता परमेश्वराने वाचा दिली आहे. ‘तुझ्या नामात मला गाेडी दे’ हेच भगवंताजवळ मागावे. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे; आणि भाव शुद्ध हाेण्यासाठी सत्समागमावाचून दुसरा उपाय नाही. एकदा त्याचे हाेऊन राहिले म्हणजे ताेच सर्व उपाय काढताे. ‘मी’ अमुक एक साधन करील असे म्हणू नये. परमेश्वरा, तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस, अशी दृढ भावना ठेवावी. समजा, आपण एक व्यापा केला. त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही; त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये. भगवंत हा सहजसाध्य आहे, सुलभसाध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येते तें ‘सहज’ हाेय. म्हणून, सहजसाध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा.
सूर्याजवळ ज्याप्रमाणे काळाेख नाही, त्याप्रमाणे ज्या अंत:करणामध्ये भगवंत आहे, तिथे बिलकुल संशय नाही.भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. जाे स्वत:पासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. जाे बाह्य दृष्टीने पाहताे त्याला भगवंत दूर आहे; जाे अंतरंग पाहताे त्याला ताे जवळ आहे. आपण मनुष्यजन्माला आलाे हीच आपण भगवंताचे हाेण्याची खूण आहे. भाेग आणि दु:ख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे. याकरिताच सतत त्याचे ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंताशी नाते जाेडून ठेवावे, यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही.