भगवंतावर ठेवलेल्या निष्ठेचा परिणाम ार आहे

    03-Jun-2023
Total Views |
 
 

Gondavlekar 
 
भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दु:ख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असताे. एक नवरा-बायकाे असे बाजाराला गेले हाेते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर ार लांब हाेते.ती दाेघे आपसात बाेलत हाेती की, ‘आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नकाे. तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ.’ त्यांचे बाेलणे दाेन लबाड माणसांनी ऐकले.ते त्यांना म्हणाले, ‘तुम्ही का घाबरता? आम्ही बराेबर आहाेत ना! आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे.आम्ही रामासाक्ष सांगताे आहाे; तेव्हा आपण जाऊ या.’ त्या नवराबायकाेला ती ंमाणसे वाईट आहेत असे वाटले नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लाेकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले.
 
पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, ‘रामा! मी या लाेकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस!’ एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले, आणि दाेन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चाेर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले, त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले, आणि त्यांना घरी पाेहाेचवले. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, ‘तसे जाऊ नका, थाेडे गूळपाणी घेऊन जा.’ ते म्हणाले, ‘नकाे, आम्हाला ार कामे आहेत.’ ती म्हणाली, ‘थांबा जरा, मी आत्ता आणतेच.’ म्हणून ती आत वळली, तेवढ्यात ते गुप्त झाले.
 
निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते पार पडले. सगुणभक्तीचा जर काही माेठा ायदा असेल तर ताे हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डाेके ठेवताे तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावे,‘रामा, आता तुझ्याशिवाय मला काेणी नाही. मला तू आपलासा करून घे.मी अवगुणी असेन, पण तू माझा अव्हेर करू नकाेस, मी तुला शरण आलाे आहे.’ आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धिमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जाे भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बनेल.लाेक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात.निष्ठेचा परिणाम ार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, ताे खात्रीने सुखाचा हाेईल.