थाेडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण कराव

    27-Jun-2023
Total Views |
 
 
 

Gondavlekar 
 
माया म्हणजे काय, तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया.जे दिसते आणि नासते ती सर्व माया.आपण जाेपर्यंत नामस्मरणात आहाेत ताेपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहाेत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण हाेते तेव्हा आपण मायेच्या आधीन आहाेत असे समजावे. माया ही शब्दांचे अवडंबर केल्याने सांगता येते. आंब्याचे चित्र दाखवून त्याच्या आकाराचे आणि गाेडीचे कितीही वर्णन केले तरी तुमचे समाधान हाेईल का? परंतु ताेच आंबा प्रत्यक्ष खाल्ल्यावर, काहीही न सांगता तुम्हांला त्याचे खरे ज्ञान हाेईल. म्हणून सर्व काही करण्यामध्ये आहे. सांगण्यात आणि ऐकण्यात नाही.निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही. म्हणून सगुणरूपच आपण पाहावे आणि त्याचेचे पूजन करावे. मी निर्गुणाची उपासना करताे असे जाे म्हणताे, त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही. कारण तिथे सांगायलाच कुणी उरत नाही. एकाने मला सांगितले की, ‘मी सर्व वेदांतग्रंथ वाचले आहेत.’ त्यावर मी त्याला म्हटले की, ‘तर मग तुम्हांला समाधान मिळालेच आहे!’ त्यावर ताे म्हणाला, ‘तेवढेच काय ते मिळाले नाही.’ ंमग एवढे वाचून काय उपयाेग झाला?
 
आपल्याला त्या वेदान्ताला घेऊन मग काय करायचे आहे? आपण आपली भाेळीभाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते. जाे जेवायला बसताे ताे ‘माझे पाेट भरावे’ असे कधी शब्दांनी म्हणताे का? पण जेवण झाले की आपाेआपच पाेट भरते! आपण ग्रंथामध्ये जे वाचताे ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयाेग काय? म्हणून आपण ारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये. कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागताे. म्हणून थाेडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे, पण सर्व स्वत:चे आहे असे समजू नये. शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना हाेतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल; आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचेच वर्ष, आणि वर्षाचेच आपले आयुष्य बनलेले असते, या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचातली कर्तव्ये करणे हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे हाेऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर ताे आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी हाेणे म्हणजे भगवंताचे हाेणे हेच हाेय.