विषयीं गुंतले सर्व जन। चित्त मन तेथें केलें अर्पण। तेथें काेणास न येई समाधान। पावे सुख दु:ख समसमान।। विषयाचा केला कंटाळा । परि मनावर बसला त्याचाच थारा।। पैका हातीं खेळवला। त्यानें हात काळा झाला । हा दाेष नाहीं पैक्याला। आपण त्याला सत्य मानला।। एका मानापाेटीं दु:खाचें मूळ। हें जाणती सर्व सकळ।। वैभव संपत्तीचा सहवास। हाच दु:खास कारण खास।। व्यवहाराच्या चालीनें चालावें। वेळ प्रसंग वर्तावें। चित्तीं समाधान राखावें।। जाेंवर जरूर व्यवहारांत राहणें। ताेंवर त्याला जतन करणें।। ज्याचा घ्यावा वेष । तैसें वागणें आहे देख।। व्यवहारांत जैसें जगानें वागावें आपल्यापाशीं। तैसेंच वर्तन ठेवावें आपण दुसऱ्यापाशीं।। ज्याचा जाे जाे संबंध आला। ताे ताे पाहिजे रक्षण केला ।। आपलेकडून काेणाचें न दुखवावें अंत:करण। तरी व्यवहारांत जें करणें जरूर ते करावें आपण।। संगत धरावी पाहून। बाह्य भाषणावर न जावें भुलून ।। मीष्ट भाषण वरिवरी। विष राहे अंतरीं। असल्याची संगत नसावी बरी।। ज्याचा त्यास द्यावा मान। लहानाचें राखावें समाधान। माेठ्याचे पुढें व्हावें लीन। वागत जावें जगीं सर्वांस ओळखून।। मनानें व्हावें श्रेष्ठ । बाह्यांगीं राहावें कनिष्ठ।।
न करावा काेणाचाउपमर्द। गाेड भाषण असावें नित्य।। आळसाला न द्यावा थारा। सगळ्या जीवनाचा घात ज्यानें केला ।। पराधीनता अत्यंत कठीण हें खरें असे। पण त्याच्याशिवाय जगतांत काेणी नसे।। तरी व्यवहारांत मिंधेपणें न राहावें। आळशीपण नसावें।। देह आळशी न ठेवावा हें जरी खरें। तरी त्याची परिस्थिति ओळखून वागणें बरें।। प्रयत्नावांचून व्हावें हित। ऐसें न आणावें चित्तांत।। मागें काय झालें हें न पाहावें। उद्यां काय हाेईल हें मनीं न आणावें। आज व्यवहारांत याेग्य दिसेल तसें वागावें।। प्रयत्नाचा कंटाळा न करावा।। आज जें मिळालें तें घ्यावें। पुढें जास्त मिळविण्याचा प्रयत्न करावा।। विना केले काम। न मिळत असे दाम।। धन संग्रहीं राखावें।। सर्वच खर्चून न टाकावें ।। थाेडें थाेडें लाेकांचें देणें देत जावें। आणखी जास्त न करावें।। नाेकरी ज्याची करणें जाण। त्याचें मानावें प्रमाण।। व्यवहारांत असावी दक्षता। अचूक प्रयत्न करावा सर्वथा।। प्रपंचांत असावें दक्ष । सत्याचा धरावा पक्ष।। जाे जाे प्रसंग येईल जैसा। प्रपंचांत वागेल तैसा। याचें नांव प्रपंचात दक्षता।। व्यवहार करावा ऐसा जतन । काेणा न दाखवावें दैन्यपण।। व्यवहार करावा ऐसा जपून । काेणाचें नुकसान न हाेऊं द्यावें चुकून।। भगवंताचे आहाें आपण। ही मनीं ठेवावी ओळखण।। समाधानाचें स्थान। एका रामावांचून नाहीं जाण ।। म्हणून राम ठेवील त्यांत मानावे समाधान।