आपण भगवंतासाठीच आलाे आहाेत

    10-Jun-2023
Total Views |
 
 
 
Gondavlekar
 
आपण स्वप्नात असताे ताेपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते.त्याचप्रमाणे जाेपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही, ताेपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानीत असताे.प्रपंच मिथ्या वाटला की भगवंत सत्य हेकळते. जे चिरकाल राहते तेच खरे सत्य हाेय. आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथे भंगते ताे मार्ग खास चुकीचा आहे.मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटताे त्याप्रमाणे, मान तुटली तरी आपण विषयसुख साेडीत नाही, याला काय करावे? जे अनुभवाने खरे शहाणे हाेतात ते या विषयसुखाचा त्याग करतात; आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते.आपले समाधान का बिघडते?
 
आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून! जाे जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा साेडून आपण त्रिभुवन जरी शाेधले तरी ताे सापडत नाही, त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शाेधले तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. समाधानाशिवाय इतर गाेष्टींनी आपल्या जीवाची तळमळ आणि हुरहुर नाहीशी हाेणार नाही. खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहात नाही; म्हणून आपल्याला समाधान नाही. आपण ज्या कार्यासाठी आलाे ते कार्य झाले की समाधान हाेते. मग जाेपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान हाेत नाही ताेपर्यंत, आपण त्या कार्यासाठी आलाे नाही असे म्हणायला काय हरकत आहे? मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून, सुख मिळावे यासाठी जे करायला जाताे ते शेवटी दु:खाचेच हाेते. म्हणून, आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे.
 
आपण भगवंतासाठीच आलाे आहाेत आणि त्याच्या प्राप्तीमध्येच आनंद आहे. जगातली काेणतीही दृश्य वस्तु आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही, किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच त्याला स्वास्थ्य मिळेल. त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे, त्याचे गुणवर्णन ऐकावे, त्याच्याशिवाय दुसरी गाेष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे हाेऊन राहावे. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काेरडा वेदान्त ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण हाेते. म्हणून नामच सर्वस्व मानावे.तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन ‘वस्तू’ मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते, आणि हे नामस्मरणाच्या याेगानेच घडून येते. म्हणूनच, नामात काय आहे हे सांगण्यापेक्षा वे घेतल्यानेच सर्व काही कळून येते.