कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वत:ला अनुभव आल्यावाचून ज्ञान सार्थकी लागले असे हाेत नाही. पाेथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पाेथी खरी कळली असे म्हणावे.पाेथीत सांगितलेले ऐकून ते जाे आचरणात आणताे ताेच खराश्राेता हाेय. वेदान्त हा राेजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयाेग. म्हणूनच सर्व प्रचीतींमध्ये आत्मप्रचीती ही उत्तम हाेय. शब्दज्ञान नसले तरी, जाे भगवंताला शरण गेला त्याला मिळवायचे काहीच उरत नाही. जाे शब्दज्ञानाच्या मागे जाताे त्याचा अभिमान बळावताे. जाे शब्दज्ञानी नसताे त्याला अभिमान नसेलच असे नाही, अज्ञानी माणसालाही अभिमान असताे; परंतु ताे घालविणे साेपे असते. ‘सद्गुरूला शरण जा’ म्हटले तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल, त्याला शंका येणार नाही. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत; पण काेणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर साेडल्याशिवाय जाता येत नाही; हे जसे खरे, तसे काेणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला, देवाचे स्मरण पाहिजे. भगवंताचे हाेणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे.
मी भगवंताचा कसा हाेईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या काेणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे हाेता येते. आपले मन वासनेच्या आधीन हाेऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते.लाेक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे. जी गाेष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे हे ध्यानात ठेवावे; म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपाेआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून र्बफ पडते त्या वेळी ते अगदी भुसभुशीत असते. पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते; त्याचप्रमाणे वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकताे. मग ती काढणे ार कठीण जाते. भगवंताची वासना ही वासना हाेऊच शकत नाही. ज्याप्रमाणे अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्त्व काढतात, त्याप्रमाणे विषयाची वासना सर्व नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना हाेय.