एखाद्यावर राग काढायचा असेल किंवा एखाद्याचा बदला घ्यायचा असेल, तर घाई करू नका. एखाद्या चांगल्या ज्याेतिष्याकडे जा आणि त्याला सांगा की, ‘मला रागवायचे आहे, एका माणसाचा बदला घ्यायचा आहे.यासाठी मला एखादा चांगला मुहूर्त काढून द्या.’ तुम्ही जर प्रत्येक शुभ कार्यासाठी मुहूर्त काढून देता तर मग अशुभ कार्य मुहूर्ताविना कशी काय घडू देता? राग व्यक्त करण्यासाठी पुष्य नक्षत्रातला अमृत याेग हा मुहूर्त सर्वांत चांगला आहे.