पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे, आणि भगवंताचे नाम घ्यावे, या तीन गाेष्टी मला ार आवडतात.त्या जाे करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही.जाे माझ्या स्मरणात प्रपंच करताे त्याला कधीही कमी पडणार नाही.माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्यापेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमीआहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जाे येईल तसा खर्च करताे, ताे मनुष्य ते सर्व मला देताे. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे.मला स्वत:चा प्रपंच करता आला नाही; पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येताे. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ हाेती; पण मी कधीही काळजी केली नाही.मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही.
उद्या जर काेणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले, तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वत:च्या श्रमाने चार आणे मिळवून पाेट भरीन. मला आवडते की एक लंगाेटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी, आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला काेण तयार आहे ? मी आपला नामाचा हट्ट कधी साेडला नाही.मी जरी जास्त गरीबांचाच आहे तरी मला प्रपंचांत कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरता नि:स्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दाेष आहे की, मला कुणाचे दु:ख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग ‘मी’ नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे.माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे; ताे परत जातांना त्याच्या डाेळ्यांत पाणी आले पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच हाेत नाही, ज्या गाेष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत काेणास ठाऊक !