गुरू आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते, तसे गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम मत समजणाऱ्याला कसली नड असणार ? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते.परिसापाशी साेने व्हायला रुप्याचे लाेखंड व्हावे लागते; तसे, गुरूचा पाठीराखेपणा असून जी आपल्याला अधाेगतीशी वाटते, ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच हाेय.बाप मुलाला हातावर घेऊन पाेहायला शिकवीत असताना मधून मधून जसा हात काढून घेताे, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही, तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजरी पडलाे तर आपणच पैसे देऊन डाॅक्टरवर विश्वास, श्रद्धा ठेवताे; औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेताे. व्यवहारात जर असे आहे, तर मग ‘श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही’ असे म्हणणे बराेबर नाही. डाॅक्टरवर आपण विश्वास ठेवताे याचे कारण असे की, आपल्याला जगायची इच्छा आहेस तसे, भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेलतर मनुष्य त्याचे नाव घेतल्याशिवाय राहणार नाही.
आधी श्रद्धा, मग कृती, आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत डायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झाेप घेताे, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे. डायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. खरे म्हणजे अशी अंधश्रद्धा ज्याला लाभली ताे लवकर सुखी झाला. अशी श्रद्धा असणे ही ार भाग्याची गाेष्ट आहे. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वत:शी प्रामाणिक बनू या.आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. तपश्चर्येचे सर्वांत शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यभावे शरण जाण्याची बुद्धी हाेय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे.