राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथाचे वाचन हेही एक आहे; परंतु काेणत्याही ग्रंथाचे अगर पाेथीचे वाचन करताना, केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये.अर्थ कळल्याशिवाय पाेथी खरी वाचल्यासारखे नाही हाेणार; तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. मी जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयाेग? चार मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे हाेईल? एक मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे.
लहान मुलाने बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून हट्ट धरला तर कसे हाेईल? त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे हाेईल? साधना करू लागावे, सद्गुरूची आज्ञा पाळावी, म्हणजे सर्व काही हाेते. जेवायला बसले म्हणजे पाेट भरायचे राहते का? खराेखर परमार्थाचीच वाट अगदी सरळ आहे; प्रपंचाचा रस्ता मात्र डाेंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्यासाेयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट, आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या साेयीसाठी आपण केला आहे ! कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे. शेताला कुंपणाची जरुरी आहे; नाहीतर ढाेरे आत येऊन शेत फस्त करतील. पणकुंपणच जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान हाेते हे जाणले पाहिजे.ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच.
परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गाेडच लागते. तसे प्रपंचातसुद्धा परमार्थ केला तर ताे गाेडच असताे. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने ताे आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे; आणि ताे आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये. पाेटात अन्न घालण्यासाठी जसे ताेंड, त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे. आपण स्वत:च्या मुलाला जसे प्रेमाने घेताे तसा परमार्थ करावा; आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेताे तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ, आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला.