लाेक कल्याणाच्या तळमळीने जाे ग्रंथ लिहिताे ताे खरा ग्रंथकार हाेय; वाचनात आलेले आचरणात आणून जाे लाेकांना सांगताे ताे खरा वक्ता हाेय; आणि सांगितलेले जाे आचरणात आणताे ताेच खरा श्राेता आणि साधक हाेय.अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे नकाे त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने हाेताे आहे. ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे.काेणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयाेग ताे करणारावर अवलंबून असताे. ज्ञान मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे.श्रीमंत-गरीब, विद्वान-अशिक्षित, लहान-थाेर, स्त्री पुरुष, या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे.
द्वेष-मत्सर वाढवील, नीतिधर्माला ाटा देईल, असे ज्ञान पुस्तकात नसावे. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शाेध लावून जगाला स्वार्थी आणि लाेभी बनवितात, आणि त्यामुळे सर्वनाश हाेताे. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे. जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान हाेय.देहसंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान; जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्त्वज्ञान. मी देहाला ‘माझा’ म्हणताे, अर्थात मी देह नव्हे. ‘माझे घर’ म्हणणारा ‘मी’ घराहून वेगळा ठरलाे. जडत्व म्हणजे काय? देहाच्या ठिकाणी ममत्व हेच जडत्व. पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे ताे शहाणा; जगाचे गूढ ज्याला कळते ताे तत्त्वज्ञानी. व्यवहाराचे गूढ ज्याला कळते ताे प्रपंची. सूक्ष्माचे ज्ञान हाेणे यात सुख आहे.आत्मा हा समुद्र आहे, तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे.
त्याची ओळख हाेऊन आत्म्याशी समरस हाेणे हेच खरे तत्त्वज्ञान आहे. ‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या’ अशा ज्ञानाच्या गाेष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील; पण नामाचे महत्त्व कळणार नाही; ते एक संतकृपेनेच कळते.नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे. आपण बुद्धिभेदापासून सावध, दूर राहिले पाहिजे. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान लाभेल.ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न हाेते, ज्याच्या याेगाने विरक्ती उत्पन्न हाेते, अनीतीचे वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग, याचा अवलंब करावासा वाटताे, ते सद्ग्रंथ; उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरी, दासबाेध, नाथभागवत. हे ग्रंथ सदाेदित वाचून त्यांचे मनन करणे, हेच ार जरुरीचे आहे; त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न हाेते.