जगामध्ये आणि जीवनामध्ये दु:ख आहे यात शंका नाही. पण त्यापैकी पंचवीस टक्केच दु:ख बाहेरून येते. युद्ध, महागाई, चाेऱ्यामाऱ्या दारिद्र्य इत्यादींचे दु:खच बाहेरून येते. पण आपले पंचाहत्तर टक्के दु:ख आपल्यामधूनच निर्माण हाेत असते. आपले शरीर, मन, आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनताे. भगवंत आनंदरूप असल्याने ताे दु:ख निर्माण करू शकणारच नाही.देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण हाेणे, असमर्थ हाेत जाणे, हा असल्यामुळे ताे आपल्या मार्गाने जाताे, ताे दु:ख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दु:खही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभाव असल्याकारणाने, ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते.भक्तांचे मन भगवंताला चिकटते, म्हणून त्यांच्या मनातून दु:ख निर्माण हाेऊच शकत नाही.
ज्याचे मन देहाला चिकटते, त्याचे मन दु:ख निर्माण करीत असले पाहिजे.भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या दाेन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, सान्त आहे. ताेच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडेतिकडे दाेनपण दिसू लागते, आणित्यातून भयरूपी समंध साकार हाेताे. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भाेगायला जन्मलेला माणूस, भयापाेटी चिंता आणि चिंतेपाेटी दु:ख निर्माण करताे.भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असताे.कालचक्र जसे िफरते तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असताे. त्याचा विसर पडला की आपण गाेंधळून जाताे, आणि आपकी कल्पना भय निर्माण करते.
भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने हे जग स्वत:तूनच निर्माण केले. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलाे तर त्याचे साह्य कसे मिळते याचा अनुभव आपाेआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे, म्हणून त्याच्या नामात रहाणाऱ्याला देहाचे काय हाेईल याचे भय उरत नाही. देहाचा लगाम त्याच्या हातात द्यावा, आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावेत.सत्याची जाणीव झाल्याशिवाय भगवंताची ओळख हाेत नाही. सत्य वस्तूला उपाधि ार असली तरी मुख्य सत्य अगदी थाेडे आणि हलके असते. भगवंत अगदी लहान आहे, हे एवढे माेठे जग ही त्याची उपाधि आहे. स्वर्ग, मृत्यू, आणि नरक या अवस्था निर्माण करणारा परमात्मा अर्थात् या अवस्थांच्या पलीकडे असला पाहिजे. जाे या जगातच परमात्म्याचा झाला ताे या तीन अवस्थांच्या बंधनापलीकडे सरळ भगवंताकडे गेला.