या जगात कर्माशिवाय काेण राहताे ? पण कर्म यथासांग हाेत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करताे याची जाणीवच हाेत नाही आपल्याला. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लाेकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जाे राहताे ताे दुसऱ्याला नावे ठेवीत नाही.मी काेण’ हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच; तसेच, ‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या’ म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डाेळे करून मुकाट्याने दूध पिते, त्याप्रमाणेसमर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डाेळे मिटून जितके काम हाेईल, अंधश्रद्धेने जे हाेईल, ते अभिमानाने, ज्ञानाने डाेळे उघडे ठेवूनही नाही हाेणार. मूल हाेऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते; माझे ‘शहाणपण’ आड येते. भक्त मुलांसारखे वागतात, म्हणून त्यांचे लाड देव पुरविताे.
कुणी असे म्हणतील की, ‘भगवंताची आणि आमची ओळख नाही, तर त्याची आम्ही कशी पूजा करावी ?’ पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे. ‘त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही’ हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला; ताे असा की, देहाने प्रपंच करा, पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा.मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयाेग नाही. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही.मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जाेर येताे.ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता हाेत नाही; पण सत्य अशा ध्येयावर अगाेदर पूर्ण श्रद्धा पाहिजे.
प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. ‘देव माझा आहे’ असे म्हणण्याऐवजी ‘मी देवाचा आहे’ असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न हाेते.समुद्राचा तरंग असताे, तरंगाचा समुद्र असताे असे नव्हे.साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे; म्हणून साधना श्रद्धेने करीत जावी. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे.प्रपंचात कधीच धीर साेडू नये.ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्यामागे असणाऱ्या हजाराे मुंग्या तिच्याबराेबर नाहीशा हाेतात, त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली, की आपल्या मनात उठणारे हजाराे संकल्प नाहीसे हाेतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान हाेते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन हाेय.