माेबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे ठरवा

    11-Apr-2023
Total Views |


Gondavlekar
सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जाे नेम कराल ताे सतत टिकण्यासारखा असताे. म्हणून आजपासून नामाशिवाय बाेलायचे नाही असे आधीच ठरवा.नामांत राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल.इथे जाे जाे म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर ताे काय करणार? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला हाेणार नाही. आता कली मातत चालला आहे; त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर निश्वास ठेवा. काेणी काहीही सांगितले तरी नाम साेडू नका.

जसे पाण्याचा माेठा लाेंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दाेराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे, नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या याेगाने ताे हळूहळू प्रकट हाेत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते.डाेक्यावर हात ठेवून चमत्कार हाेणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत हाेणे, इत्यादी गाेष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त, हाडकुळा मनुष्य लठ्ठ हाेण्यासाठी ‘अंगाला सूज येऊ दे’ असे म्हणाला तर ते वेड्यासारखे हाेईल; याच्या उलट, त्याने नीट औषध घेतले तर, ताे कदाचित लठ्ठ हाेणार नाही, पण त्याचे शरीर घट्ट हाेईल.

तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे; आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी.नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल.प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे असतात. खराेखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत! पैसा, लाैकिक, मुले, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे! त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण हाेय, नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण हाेय. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. म्हणून नामात सत्संगतीही आहे.माेबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा.