भाव असल्याशिवाय परमार्थ हाेत नाही

    01-Apr-2023
Total Views |
 
 

Gondavlekar 
प्रपंचात जसा पैसा लागताे त्याप्रमाणे परमार्थात भाव लागताे.प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय हाेत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती हाेईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली; तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. तुम्ही सर्वांना गाेपीची गाेष्ट माहीत असेलच.त्या गाेपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे हाेते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना, त्यावर तिने सांगितले की, हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही; असे म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही! त्याप्रमाणे आपण परमार्थांत भाव ठेवणे जरूर आहे.
 
पण असे आपण नुसते म्हणून काय उपयाेग? ताे सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, असे आपण म्हणताे, पण आपण पापाचरण करायला भिताे का? ताे आपल्याला पाहाताे आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप हाेईल का? पण आपल्याला तसे वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव ‘हवा’ असे वाटते खरे, पण ‘हवाच’ असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्यामदतीसाठी देव हवा असे वाटते. प्रपंच ‘असावाच’ असे आपल्याला वाटते, आणि भगवंत मात्र,‘असला तर बरा’ असे वाटते. याच्या उलट, ‘भगवंत असावाच’ आणि ‘प्रपंच असला तर बरा’ असे वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे, आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे.
 
ज्या गाेष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी. ज्यांना व्याप आहे ते लाेक रडतात, आणि ज्यांनां व्याप नाही तेही लाेक रडतात; मग सुख कशात आहे? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे हाेणे हीच समजूत तेवढी खरी आहे. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही; म्हणून आपण आपले कर्तव्य तेवढे करावे, आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित हाेऊ देऊ नये. भगवंताजवळ पाेटापुरते मागायचा आपल्याला हक्क आहे, पण आपण लाेभात सापडता कामा नये. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा, त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करताे.